नगरसेवकांच्या टोळीकडून ठाकरे, पवार, लंके यांची दिशाभूल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  :  शिवसेनेतून राष्ट्रवादीत व त्यानंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांच्या टोळीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,

तसेच आमदार नीलेश लंके यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे व उद्योजक अर्जुन भालेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

माजी आमदार विजय औटी व पाच नगरसेवकांच्या वादाची राज्यभर चर्चा झडत असताना चेडे व भालेकर यांनी या वादात उडी घेेतल्याने तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली.

गेल्या साडेचार वर्षांत त्यांनी विकासाचा विचार का केला नाही? सत्तांतर झाल्यानंतरच विकास का डोक्यात घुसला? विधानसभा निवडणुकीत नेतृत्व पराभूत झाल्यानंतर यांना विकास कळाला का?

नगरपंचायतीच्या मासिक सभांमध्ये पाचपैकी किती नगरसेवकांनी पाणी योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले? किती प्रस्ताव सादर केले? कोणास निवेदन दिले? त्या नगरसेवकांनी स्वतःच सभांचे इतिवृत्त जनतेसमोर मांडावे, असे आव्हान चेडे व भालेकर यांनी दिले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment