खासदार सुजय विखे म्हणाले पाच दिवसांचा लॉकडाऊन झाला तर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात किमान 5 दिवसांचा लॉकडाऊन करावा या भूमिकेवर मी एक डॉक्टर म्हणून ठाम व आग्रही आहे, अशी प्रतिक्रिया खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेऊन तुर्तास नगरमध्ये लॉकडाऊनची गरज नाही, असे जाहीर केले.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना खा.विखे म्हणाले, नगरमध्ये लॉकडाऊनची मागणी आपण केली होती. प्रशासनाच्या अहवालानुसार पालकमंत्र्यांनी लॉकडाऊन न करण्याचा निर्णय घेतला.

सरकार म्हणून त्यांचा तो अधिकार आहे. परंतु आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत.वाढती रुग्ण संख्या पाहता यंत्रणेवरच ताण येणार आहे.

पाच दिवसांचा लॉकडाऊन झाला असता जुने बरे होऊन रुग्ण घरी जाऊन तर नवीन रुग्णांसाठी बेडस उपलब्ध होतील. लॉकडाऊनमुळे करोना संसर्ग थांबणार नाही. पण यंत्रणा सज्ज करण्यास वेळ मिळेल, असे मत खा.विखे यांनी व्यक्त केले.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment