भूषणावह ! राम मंदीराच्या भूमिपूजनासाठी अहमदनगर मधील ‘ह्या’ एकाच व्यक्तीस निमंत्रण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-अयोध्येतील राममंदिरचा वाद खूप काळ सुरु होता. शेवटी न्यायालयाने हा वाद निकाली काढून अनेक वर्षांपासून सुरु असलेला हा वाद थांबवला.

आता राम मंदिर उभारण्याचा मुहूर्त अखेर ठरला असून 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे.

या शिलान्यास सोहळ्यास श्रीक्षेत्र देवगडचे महंत व पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे विश्वस्त भास्करगिरी महाराज यांना विशेष निमंत्रित म्हणून निमंत्रित करण्यात आले असून ते तीन तारखेला अयोध्येस रवाना होणार आहेत.

भास्करगिरी महाराज रामजन्मभूमी आंदोलनावेळी महाराष्ट्र कार सेवा समितीचे प्रमुख होते. महाराष्ट्रातून न्यासाचे विश्वस्त असलेले गोविंददेव गिरीजी व्यास

यांच्यासह भास्करगिरी महाराज यांना निमंत्रित केल्यामुळे जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यभरातील भक्तगण व राम भक्तांमधून आनंद व्यक्त होत आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment