धोका वाढला : चोवीस तासांत कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ६० झाली आहे. आणखी २६१ रुग्ण आढळ्याने बाधितांची संख्या ४१८५ झाली आहे. 

जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९७, अँटीजेन चाचणीत २४ आणि खासगी प्रयोगशाळेत १४० पाॅझिटिव्ह आढळले. उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या १४०४ झाली.

३०३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. घरी सोडलेल्या रूग्णांची एकूण संख्या २७२१ इतकी झाली. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.०२ टक्के आहे. मंगळवारी जिल्ह्यात ८५ रूग्ण आढळले.

यात नेवासे ४, राहुरी १, जामखेड १, राहाता ६, भिंगार ४, कर्जत १०, नगर शहर ७, अकोले १६, कोपरगाव १, पाथर्डी १७, संगमनेर १७, श्रीगोंदे १ रुग्णाचा समावेश होता. सायंकाळी १२ रूग्णांची भर पडली.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment