हवामान विभागाचा अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा ! तुम्ही घ्या अशी काळजी ..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  भारतीय हवामान खात्याकडून दिनांक 5 ऑगस्ट व 6 ऑगस्ट 2020 या कालावधीमध्ये अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहेत्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी , विशेषतः नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

आपत्कालीन परिस्थितीत नजिकच्या तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील टोल फ्री क्रमांक 1077 अथवा 0241- 2323844 व 2356940 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. आज पर्यंत अहमदनगर जिल्ह्यात 448.5 मि. मी.(जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्याच्या 99.02%) पर्जन्यमान झाले आहे.

दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10 वाजता अहमदनगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा नदी दौंड पुल येथे 2, 223 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच कर्जत तालुक्यातील सीना धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाचे सांडव्याद्वारे 157 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील निसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे,. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावेत. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे.

तसेच पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्र पासून तसेच ओढे व नाले या पासून दूर राहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट/ मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये.

अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. या दृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरणा व नदी क्षेत्रांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये.

अचानक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास जीवितास धोका उद्भवू शकतो. धोकादायक ठिकाणी सोडू अथवा उतरू नये, धोकादायक ठिकाणी ते सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडाच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप नीचित यांनी कळविले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment