खासदार डॉ.सुजय विखेंनी सांगितले जिल्ह्यात कोरोना वाढण्याचे कारण…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येने आतापर्यंत सात हजारचा आकडाही ओलांडला आहे.

खा.डॉ सुजय विखे म्हणाले कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे ट्रेसिंग करण्यासाठी 5 दिवस कडक लॉकडाऊनची मागणी होती. पण ती टाळली गेली, त्याचे परिणाम दिसत आहेत, रोज रुग्ण संख्या शेकड्याने वाढत आहे.

शिवाय मी जिल्ह्यात नव्हे तर केवळ नगर मनपा हद्दीत लॉकडाऊनची गरज व्यक्त केली होती. रोजगार, उद्योग व्यवसायावर लॉकडाऊनचा परिणाम होणार, हे खरे असले, तरी सध्याच्या काळात रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध व त्यांच्यावर उपचार गरजेचे आहेत.

लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाकडून ज्या भागात रुग्ण सापडले आहेत, तेथील ट्रेसिंग झाली नाही. पॉझिटिव्ह रुग्ण संपर्कातील व्यक्तींची ट्रेसिंग करून त्यांच्यावर तातडीने उपचार केले असते तर ही वेळ नगर जिल्ह्यावर आली नसती, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.

समाजात 90 टक्के लोक मास्क, सोशल डिस्टन्स, सिनिटायझेशन नियम पाळतात. पण 10 टक्के समाजकंटक नियम पाळत नाहीत व करोना पसरण्यास कारणीभूत होतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment