आ. रोहित पवारांच्या मतदार संघात कर्फ्यूचा फज्जा ; वाचा नक्की काय झाले ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आ. रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये अर्थात जामखेडमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश मिळाले होते.

परंतु लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्हा जामखेडमध्ये कोरोना रुग्ण वाढले आहेत. याच पार्शवभूमीवर कोरोना प्रतिबंधासाठी तहसील कार्यालयात प्रशासन,व्यापारी व काही संघटनेच्या वतीने जामखेड तालुक्यात ८ आॅगस्टपासून पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या जनता कर्फ्यूला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता.

परंतु सर्वच राजकीय पक्ष, संघटनांनी विरोध केला आहे. रविवारपासून दुकाने चालू ठेवण्याचा निर्णय सर्वपक्षाच्या वतीने घेतला आहे. याबाबत तसा फलक शहरात लावण्यात आला आहे.त्यामुळे आ. रोहित पवारांच्या मतदार संघात कर्फ्यूचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. कोरोना प्रतिबंधासाठी तहसील कार्यालयात प्रशासन, व्यापारी व काही पक्ष संघटनेच्या वतीने पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या जनता कर्फ्यूला राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला होता. दरम्यान यातून शिवसेना, भाजपा, राष्ट्रीय समाज पक्षाने आपल्याला याबाबत कोणी विश्वासात घेतले नसल्याने बंदमधून दूर राहणे पसंत केले आहे.आजच्या (१० आॅगस्ट) जनता कर्फ्यूला व्यापारी, व्यावसायिकांंनी ९० टक्के प्रतिसाद दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरूण जाधव, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे,

शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, भाजपा शहराध्यक्ष बिभिषन धनवडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष विकास मासाळ, नाभिक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत राऊत, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष अण्णासाहेब सावंत,स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, व्यापारी संघाचे सदस्य राहुल उगले यांनी या जनता कर्फ्युला विरोध केला आहे. लॉकडाऊन करण्यापेक्षा एखादे कोवीड सेंटर उभा करा.

एखादे पेशंट नगरला गेले तर तेथे बेड शिल्लक नाही. ते येथे उपलब्ध करुन उपचाराचा मार्ग स्वीकारावा. कोरोना संदर्भात जनजागृती करा आणि कोरोनाबरोबर जगण्यासाठी लॉकडाऊन पर्याय नाही.संभाजी ब्रिगेड या गोष्टीचा निषेध करीत आहे. रविवारपासून होणारा लॉकडाऊन कोणी पाळू नये, असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांंनी केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment