‘मोदी फक्त घोषणा करतात, प्रत्यक्षात काहीच मिळत नाही’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- मोदी सरकारने शेती आणि उद्योगांसाठी २० लाख करोड रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यानंतर आता त्याच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. ‘कहां गये वो २० लाख करोड?’ हे अनोखं आंदोलन आहे.

या आंदोलनाच्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या घटकांना भेटून पक्षाचे कार्यकर्ते माहिती संकलित करीत आहेत. या दोन्ही क्षेत्रांसाठी काहीही मिळाले नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे भाजपच्या सरकारचा हा सुद्धा एक जुमलाच आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनंतर मंगळवारी उद्योग क्षेत्रातील काही मंडळींना भेटून माहिती संकलित करण्यात आली. त्याचे विश्लेषण करताना तांबे यांनी ही टीका केली आहे. ते म्हणाले, जीएसटीमध्ये सूट न मिळाल्यामुळे व्यापारी वर्ग नाराज आहे. कर संकलन पूर्वीसारखेच आहे. या पॅकेजनुसार कर्जासाठी जी तरतूद आहे, त्यानुसार हे कर्ज व्याजासह परत करायचे आहे.

जर व्याजासह कर्ज वसूल केले जाणार असेल तर यात मदत झाली कशी म्हणता येईल. कुठल्याही व्यापाऱ्याला कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य मिळाले नसल्याचे पाहणीत स्पष्ट झाले आहे. मोदी फक्त घोषणा करतात,

मोठमोठे आकडे बोलतात. पण प्रत्यक्षात काही मिळाले असे आजवर कधीच झाले नाही असा उद्योजकांचा एकूण सूर होता. या संवादानंतर युवक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला फोन करून आणि पत्र लिहून शेतकऱ्यांच्या मागण्या समोर ठेवल्या आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment