आज ४७८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज तर नव्या ६८ रुग्णांची भर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ४७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७७४१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७२.३९ टक्के इतकी आहे. 

दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६८  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २८३५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६८ रुग्ण बाधित आढळून आले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये  मनपा २६, पाथर्डी ०४,  नगर ग्रामीण १४, श्रीरामपुर ०१, कँटोन्मेंट ०७, नेवासा १२,  पारनेर ०१, शेवगाव ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ४७८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १८५, संगमनेर २२, राहाता १४, पाथर्डी ३०, नगर ग्रा.२६, श्रीरामपूर ३७ , कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २२,   श्रीगोंदा १५, पारनेर १८, अकोले ०६, राहुरी ०४, शेवगाव २५, कोपरगाव ३७, जामखेड ०३, कर्जत १७ आणि मिलिटरी हॉस्पीटल ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे-

बरे झालेले एकूण रुग्ण:७७४१ उपचार सुरू असलेले रूग्ण:२८३५ मृत्यू: ११८ एकूण रूग्ण संख्या:१०६९४

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

Leave a Comment