तर मात्र जनता संचारबंदी लागू करावी लागू शकते …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव शहर व तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. त्यामुळे पुन्हा जनता संचारबंदी करावी की नाही यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगाव नगरपरिषद येथे बैठक आयोजित केली होती.

बैठकीत सध्या जनता संचारबंदी नको असा सूर उमटल्याने तूर्त तरी संचारबंदी करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली. बैठकीत जनता संचारबंदीमुळे लहान मोठ्या व्यावसायिकांचे होणारे हाल,

व्यवसायासाठी वेळ वाढवून देणे, कोव्हिड केंद्रावरील स्वच्छता, बाहेर गावाहून आलेल्या पाहुण्यांबद्दल प्रशासनाला माहिती देणे, कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात जागृती करणे इ. विषयांवर चर्चा झाली.

चर्चा झाल्यानंतर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सांगितले, सद्यस्थितीत जनता संचारबंदी लागू न करता, येणार्‍या काळात जर अजून जास्त धोकादायक पद्धतीने करोनाचा प्रादुर्भाव वाढला तर मात्र जनता संचारबंदी लागू करावी लागू शकते

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment