खरीप पीक कर्जासंदर्भात मोठी बातमी; वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- सध्या सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमधून कर्ज मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच सध्याची परिस्थिती पाहता कर्ज प्रकरण करताना अनेक समस्यांचा सामनाही शेतकऱ्यांना करावं लागत आहे.

या अनुषंगानेच 2020-21 खरीप हंगाम पीक कर्ज वाटपासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुदत ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

याची आधीची मुदत हे आजची म्हणजे १५ ऑगस्ट होती. अशी माहिती बैंकचे चेअरमन सिताराम पाटील गायकर व ज्येष्ठ संचालक माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.

बँकेने 14 ऑगस्टपर्यंत 1 हजार 500 कोटीचे पिक कर्ज वाटप केले आहे. शासनाने दिलेले चालू खरीप हंगामासाठीचे उद्दिष्ट 1 हजार 498 कोटींचे उद्दिष्टपुर्ण केले असल्याची माहिती बँकेचे चेअरमन गायकर पाटील यांनी दिली.

शासनाने शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटपासाठी मोठया प्रमाणावर मोहिम हाती घेतल्याने चालु हंगामात बँकेस खरीप कर्ज वाटप मोठया प्रमाणावर होणार असल्याचा अंदाज गायकर यांनी यांनी व्यक्त केला

असून बँकेने त्यादृष्टीकोनातून सर्व आवश्यक बाबींची तयारी ठेवलेली आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. आलेल्या समस्यांचे निराकरण करून शेतकऱ्यांना आता कर्ज मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment