‘कांद्याला विशेष अनुदान द्यावे’ माजी आ. कोल्हे म्हणतात..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- देशभरात असलेल्या कोरोनाच्या संकाटामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले.

आता यात भर म्हणून कांद्याबाबत मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. काही कांदा चाळीमध्ये खराब झाला तर दुसरीकडे बाजारभाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

त्यामुळे या आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यास राज्य सरकारने दिलासा देण्यासाठी कांद्याला विशेष अनुदान जाहीर करावे,

अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

मागील सरकारच्या काळात कांदा बाजारभाव घसरणीच्या काळात तत्कालीन सरकारने कांद्यासाठी प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देऊन शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे काम केले होते.

या सरकारनेही कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कांद्याला विशेष अनुदान देण्याची मागणी कोल्हे यांनी केली. शेतकरी कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात सापडला आहे.

आता अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकरी आणखीनच कोलमडला. थोडा फार कांद्याचा आधार मिळेल अशी अपेक्षा असणारा

शेतकरीवर्ग भाव कोसळल्याने आणि काही कांदा सडल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यास साहाय्य करावे असे माजी आ. कोल्हे म्हणाल्या.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment