पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उडविली खासदार सुजय विखेंची खिल्ली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-नगर जिल्ह्यातील कोरोना स्थितीबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार रोहित पवार व संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी उपस्थित होते. नगरमध्ये लॉकडॉऊन करण्याची मागणी सातत्याने खा. डॉ. सुजय विखे करीत आहेत.

पण, पालकमंत्र्यांच्या बैठकीस ते अनुपस्थित होते. याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, आजच्या बैठकीला ज्यांनी मागणी केली होती तेच आले नाही.

ते आले असते व त्यांनी तशी मागणी केली असती तर त्यावर चर्चा देखील झाली असती, अशा शब्दात त्यांनी विखे यांची खिल्ली उडवली आहे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार आहे.

आमच्यातील एकही आमदार इकडचा तिकडे होणार नाही आणि फुटणारदेखील नाही. जर असे काही झाले तर तो पुन्हा निवडून देखील येणार नाही, अशा शब्दात मुश्रीफ यांनी भाजपला तसेच स्वकियांनाही इशारा दिला.

भाजपने रामदास आठवले यांना राज्यसभेचे खासदार केले आहे. त्यामुळे त्यांना काही ना काही बोलावे लागत आहे, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला.

भाजपवाले काही म्हणू द्या, मात्र महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार आहे, असा दावाही त्यांनी केला. ग्रामपंचायत प्रशासक नेमण्यासंदर्भात न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे.

न्यायालयाने नियुक्त्या करू नका, असे निर्देश दिले आहेत. येत्या काही दिवसांत याची सुनावणी होणार असल्याने त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल,

असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असल्याने त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले. डाळिंबाच्या प्रश्नाबाबतही योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment