आणि पार्थ पवार म्हणाले सत्यमेव जयते !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंदर्भात निर्माण झालेला तेढ सोडवण्याच काम आता सीबीआय करणार आहे. रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायालयाने निकाल दिला.

यात सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआय करेल, असे आदेश न्यायालयाने दिले. याच मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी एक सूचक असे ट्विट केले आहे.

त्यांनी केवळ सत्यमेव जयते! हे दोन शब्द ट्विट केले आहेत. पार्थ यांनी सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली होती.

त्यावर ती पक्षाची भूमिका नसून त्यांची वैयक्तिक मागणी असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेतेमंडळींनी पार्थ यांच्याबाबत काही टिपण्णीदेखील केली होती.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृत्यू १४ जूनला झाला होता. त्यानंतर या प्रकरणात दोन महन्यांचा काळ उलटून गेल्यावरही कोणताही निष्कर्ष निघू शकलेला नाही.

या प्रकरणावर लवकरात लवकर न्याय मिळावा असे सुशांतचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला वाटत होते. सुशांतसिंह याची बहीण श्वेतासिंह कीर्ती,

त्याची माजी गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेसह त्याचे मित्र आणि चाहते गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर न्यायाची मागणी करत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment