पुन्हा पाऊस झाल्यास ‘ते’ धरण पूर्ण क्षमतेने भरण्याचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे.

सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत. पाण्याची आवक सुरु असल्याने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा धरणामध्ये पाण्याची आवक वाढत चालली आहे.

या धरणाची २६ हजार दलघफू क्षमता आहे. या मुळा धरणात ५ हजार ३२७ क्युसेकने आवक होत असल्याने काल सायंकाळी ६ वाजता १९ हजार ९३८ दलघफू पाणीसाठा झाला होता.

आज या धरणातील पाणीसाठा २० हजार दलघफूपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. पावसाचा पुन्हा अंदाज देण्यात आला आहे. पाणलोटात पुन्हा पाऊस झाल्यास हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याने येणारी आवक निळवंडे धरणात सोडण्यात येत आहे. गत सायंकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदरा धरणात 239 दलघफू पाणी आले. ते पाणी निळवंडेत सोडण्यात आले.

भंडारदरात सध्या 10613 दलघफू पाणीसाठा आहे. तर निळवंडेत 6935 दलघफू पाणी आहे. काल सायंकाळी भंडारदरातून 5540 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते.

तर निळवंडेतून 8070 क्युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, १५ ऑगस्टला या ठिकाणी पर्यटकांची तोबा गर्दी होत असते.

निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची आणि आनंद लुटण्याची संधी आणि आनंद पर्यटक घेत असतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment