सुशांतसिंह प्रकरणाबाबत माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला ‘हा’ आरोप !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआय कडे देण्याचा शहाणपणा राज्य सरकारने आधीच दाखवायला हवा होता.परंतू सरकारने जनतेचे लक्ष विचलीत करुन सत्य दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गणेशाची स्थापना केल्यानंतर आ.विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने सुरु केला आहे.यातून खरे सत्य निश्चित समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारसमोर निर्णय घेण्याचे कोणतेच धोरण नाही.शाळा उघडण्यापासून ते महाविद्यालयांच्या परिक्षा घ्यायच्या की नाही याबाबत सरकारकडे स्वतःची भूमिका नसल्याने सरकार गोंधळलेल्या आवस्थेत काम करीत असल्याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.

समाजहिताचे कोणतेच निर्णय सरकार घेवू शकत नाही.शेतकरी दूध उत्पादकांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही.राज्यात अतिवृष्टी झाली.शेतकरी पुन्हा संकटात सापडला असलातरी सरकारची कोणतीही मदत नाही.दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर येवून आंदोलन करतात पण सरकार जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची टिका करून आ.विखे यांनी सांगितले,

की मंत्र्यांचेच दूधसंघ असल्याने त्यांनीच सरकारची अनुदान दडपण्याचा प्रयत्न केल्याने शेतकर्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही.ग्राहकांना विक्री केल्या जाणाऱ्या दूधाचे दरही कमी झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. कोव्हीड १९ संकटातही राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही.

कवडीमोल भावाने शेतीमाल विकावा लागला किंवा फेकून द्यावा लागला सरकार नावाची व्यवस्था कोणत्याच संकटात शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसाला मदत करू शकलेली नसल्याची खंत आ.विखे यांनी व्यक्त केली. राज्य सरकारने सर्वच व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

राज्यातील माॅल सुरू करण्यासाठी राज्य सरकारने एक पाउल पुढे टाकले मग मंदीरांबबात सरकार निर्णय का घेतला जात नाही असा प्रश्न उपस्थित करून आ.विखे पाटील म्हणाले राज्यातील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेले व्यवसाय पाच महीन्यांपासून बंद असल्याने व्यावसायिकांचे अर्थचक्र थांबले आहे.सुरक्षिततेचे नियम पाळून मंदीर उघडण्यास सरकराने परवानगी द्यावी आशी मागणी आ.विखे यांनी केली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment