जनतेचे हित महापौरांनी राजीनामा द्यावा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर शहरात रूग्ण संख्या आटोक्यात येताना दिसत नाहीय ,रोज रूग्ण वाढण्याच्या सरसरीत देखील वाढ होत आहे व त्यातच महानगरपालिके कडून होत असणारा अतिशय ढोबळ कारभार रोज नव्याने उघड होऊन चव्हाट्यावर येत आहे.

अशा परस्तिती मध्य महापौर बाबासाहेब वाकळे यांचे ज्या प्रकारे यंत्रणेवर नियंत्रण असायला हवे असे कुठेच दिसत नाहीय असे म्हणत युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे यांनी महापौरांवर जोरदार टीका केली होती

व तात्काळ यात सुधारणा न झाल्यास आम्ही ठोस भूमिका घेऊ असे देखील प्रतिपादन केले होते, त्यानंतर आता पाटोळे यांनी थेट महापौरांना हा सगळा भार सोसत नसेल तर जनतेचे हित पाहता आपण राजीनामा द्यावा अशी

आक्रमक मागणी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे. हे पद ह्या संकट समयी अतिशय जबाबदार आहे, जर आपल्याला परिस्थिती हाताळण्याचे जमत नसेल तर आपण ही जागा रिक्त करावी असे पाटोळे यांनी म्हंटले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment