आता तुम्हीच न्याय द्या; उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  कर्जत शहरातून जाणाऱ्या भिगवन- खेड- अमरापूर रस्त्याचे काम सुरु होण्याचा मार्गवर आहे. त्यासाठी शहरातील अक्काबाई नगर ते दादा पाटील महाविद्यालयापर्यंत असलेल्या गाळे धारकांना हटवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला खुणा करणे सुरु आहे.

यामुळे गाळे धारकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांचा वर्षांनुवर्षापासून आहे. गाळे हटविले व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे रस्त्यावरील दुतर्फा असणाऱ्या गाळे धारकांना न्याय द्यावा, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार रोहित पवार यांच्याकडे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केली आहे.

याबाबतचे त्यांनी निवेदन पाठविले आहे. नामदेव राऊत यांनी खासदार डॉ. विखे पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की नगरपंचायत हद्दीतील अक्काबाई नगर ते दादा पाटील महाविद्यालयापर्यंत सदर रस्त्याच्या दुतर्फा असणारे गाळे (टपरी) धारक सुमारे ५० वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत.

येथे सर्वसामान्य युवक व्यवसाय करीत असून त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. सध्या कोरोनाच्या महामारी मुळे सततच्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून कर्जाचे हप्ते थकले आहेत.

अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सदर रस्त्याच्या कामासाठी दोन्ही बाजूला खुणा केल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

यापूर्वी 1996- 97 मध्ये तत्कालीन मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील व तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून जैसे थे परिस्थिती ठेल्यामुळे आजतागायत या व्यवसायिकांचया कुटुंबाची उपजीविका सुरू आहे. हे गाळे उध्वस्त झाले तर 325 गाळे धारक आणि त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येतील.

तरी त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आमदार रोहित पवार यांना निवेदन देताना म्हटले, ग्रामपंचायतचा मी सरपंच व उपसरपंच असताना तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे व प्रा. राम शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

त्याला यश आले होते. आजतागायत हे सर्व कुटुंबाची उपजीविका सुरु आहे. राज्यात आपल्या पक्षाचे सरकार असून आपण आमदार असल्याने न्याय देऊ शकता. सध्या या जागेतील गळ्यांचे ते गाळे धारकच मालक आहेत. शहराला पर्यायी मार्ग बायपास साठी दोन तीन पर्याय आहेत. तो करून या गाळे धारकांना न्याय द्यावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment