दहावी-बारावी नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा पुढे ढकलल्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  दहावी आणि बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा ऑक्टोबर महिन्यात न घेण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली. शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले की, फेब्रुवारी- मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची

फेरपरीक्षा ही बहुतेकवेळा ऑक्टोबर महिन्यात घेतली जाते. मात्र, यंदा करोनाचे संकट असल्याने ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

कदाचित ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात घेण्याची शक्यता आहे. दहावीमध्ये सुमारे 1 लाख 25 हजार विद्यार्थी तर बारावीमध्ये 1 लाख 80 हजार विद्यार्थी नापास झाले आहेत.

सोबतच काही विद्यार्थी असेही आहेत ज्यांना एटीकेटीदेखील प्राप्त झाली आहे. दहावीतील एटीकेटी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची परवानगी आहे.

परंतु, नापास आणि एटीकेटी विद्यार्थ्यांना एक संधी म्हणून आपण फेरपरीक्षा घेण्याचा विचार करत आहोत, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment