धक्कादायक! कोरोनाने घेतले आणखी ‘इतके’ बळी ; मृतांची संख्या @ ३३९

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला आहे. रिकव्हरी रेट जरी चांगला असला तरी मृत्यूचे प्रमाणवाढले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

नुकत्याच आलेल्या अहवालानुसार काल सायंकाळी ६ ते आज दुपारी १२ वाजेपर्यंत ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बळींची संख्या ३३९ झाली आहे.

त्याआधीच्या अहवालानुसार त्यामागील २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाले होते. दरम्यान, कोविड चाचणीसाठी नागरिकांची फरफट अजूनही कायम आहे.

नगर शहरातील रामकरण सारडा वसतिगृहातील चाचणी केंद्रात सकाळपासूनच लोक येतात.अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांची चाचणी केली जाते. बुधवारपर्यंत जिल्ह्यात ३०६ जणांचा मृत्यू झाला होता.

त्यात आणखी ३३ रुग्णांची भर पडली. दरम्यान, जिल्ह्यात आज तब्बल ५४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २० हजार ५१० इतकी झाली आहे.

तर आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७० ने वाढ झाली. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ६५७ झाली आहे.

आज बाधीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ११३, संगमनेर ०२, पाथर्डी ०४, नगर ग्रामीण १२, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट ०३, श्रीगोंदा ११, पारनेर ०३, शेवगाव १३, कोपरगाव ०६, इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment