पत्रकार रायकरांचा मृत्यूला आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा कारणीभूत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचे संकट घोंगावत असताना केवळ मोठ मोठी हॉस्पिटल उभारले गेली त्यामध्ये मात्र सुविधांचा अभाव असल्याने एका अभ्यासू पत्रकाराला आपले प्राण गमवावे लागले आहे.

शासकीय आरोग्य यंत्रणेच्या सुविधांच्या अभावामुळे कोपरगावचे पत्रकार जावाई पांडुरंग रायकर (वय ४२) यांचा बळी गेल्याची चर्चा तालुक्यात जोरदार सुरू झाली. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीचे पुणे येथील प्रतिनिधी व कोपरगाव शहरातील अंबिकानगर येथील जावई पांडूरंग रायकर हे ५ दिवसापुर्वी पत्नी व दोन लहान मुलांना भेटण्यासाठी आले होते.

सोमवारी त्यांना श्वसनासह इतर शारिरीक त्रास जाणवू लागल्याने कोपरगाव कोव्हीड सेंटर येथे तपासणी केली असता त्यांना करोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले. त्यांना कोपरगावच्या आत्मा मालीक खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी गेले असता अनामत रकमेवरुन हॉस्पिटल व रायकर कुटुंबात वाद झाला.

चर्चा व वादविवाद नंतर पांडूरंग रायकर यांच्यावर एकदिड तासानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले. मात्र उपचारा अभावी ताटकळत राहील्याने पांडूरंग रायकर यांची प्रकृती अधिकच खालावली. उपचारा सुरू केला पण समाधानकारक न वाटल्याने रायकर यांना संजीवनी महाविद्यालयाच्या आत्याधुनिक रुग्णवाहिकेतून

तातडीने पुणे येथे उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले पण तेथेही अपेक्षित उपचार होत नसल्याने पुढे घेवून जाण्यासाठी त्या रुग्णालयाकडे सर्व सुविधानियुक्त रुग्ण वाहिका न मिळाल्याने अखेर योग्य उपचारा अभावी रायकर यांचा दुर्दैवाने मृत्यु झाला. रायकर यांचा करोना पेक्षा व्यवस्थेने बळी गेला असे म्हणण्याची वेळ पत्रकारावर आली आहे.

स्वताःचा जीव धोक्यात घालून इतरांच्या समस्या पोटतिडकीने मांडणाऱ्या पत्रकारांच्या बाबतीत शासकीय यंत्रणा किती उदासिन आहे. हे, या बळी गेलेल्या पत्रकाराच्या घटनेवरून सिध्द होत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment