या पेक्षा दुदैव काय असाव ? ‘त्याची’ चूक इतकीच कि रस्त्याच्या कडेला उभा राहिला होता…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने दररोज हजारो अपघात घडतात व त्यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागतात. मात्र केवळ रस्त्याच्या कडेला उभा राहिल्याने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नगरहून औरंगाबादकडे भाजीपाला घेऊन जाणा-या टेम्पोची (एम.एच.-१२, एन.एक्स.-६१५७) मागील बाजूची दोन्ही चाके निखळली. यातील एक चाक वेगाने रस्त्याच्या दुस-या बाजूला गेले.

एका मिठाईच्या दुकानाच्या समोरील खांबाला या चाकाची धडक बसली. तेथेच आपले फळाचे दुकान बंद करून उभ्या असलेल्या संदीप जोंधळे यांना त्या चाकाचा जोराचा फटका बसला.

त्यामुळे डोक्याला गंभीर मार लागला. जखमी संदीप यांना नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दहा वर्षांपासून नेवासा फाटा येथे जोंधळे यांचे फळांचे दुकान आहे. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजई असा परिवार आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment