आमदार रोहित पवार जेव्हा खासदार डॉ सुजय विखेंचे कौतुक करतात तेव्हा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- कर्जत शहरातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण केल्यास या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गाळेधारकांना विस्थापित व्हावे लागेल अशी भीती व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती.

परंतु विस्थापित होणाऱ्या गाळेधारकांचे पुनर्वसन करून रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात येईल असे आ. रोहित पवार यांनी गाळेधारकांना आश्वासित केले.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरातील रोडवरील रस्ता रुंदीकरणाचे काम पुढील आठ महिन्यांसाठी राहील व त्यानंतर विस्थापित होणाऱ्या गाळेधारकांचे पुनर्वसन करून रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात येईल.

त्यामुळे व्यापारी बांधवांनी आता निश्चिंत राहावे असे विधान आ. पवार यांनी केले. मेन रोड शहर व्यापारी संघटना व आ . रोहित पवार यांची बैठक श्रीराम मंगल कार्यालयामध्ये शुक्रवारी ( दि . ४ ) पार पडली.

यावेळी आमदार पवार बोलताना म्हणाले की खा . डॉ . विखे यांनी गाळेधारकांबाबत घेतलेली भूमिका योग्य आहे. आम्ही दोघे एकाच विचाराने काम करत असल्यामुळे ही अडचण राहणार नाही.

* खा. सुजय विखे काय म्हणाले होते?: – नगरपंचायत हद्दीतील अक्काबाई नगर ते दादा पाटील महाविद्यालय पर्यंतचा रस्त्याच्या बाजूला गाळेधारक सुमारे पन्नास वर्षापासून व्यवसाय करीत आहेत.

गाळे जमीनदोस्त झाले तर सुमारे 300 पेक्षा जास्त गाळेधारक आणि त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येतील. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन खासदार डॉ. सुजय विखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला बाह्यवळणं रस्ताचे प्रस्ताव तयार करण्यासाठी सूचना केली होती.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment