‘येथे’ होतेय जनावरांची चोरी; शेतकरी धास्तावले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या या गावातील शेतकऱ्यांचे जनावरे चोरटे पळवत असल्याच्या धक्कदायक घटना सलग तीन वेळेस घडल्या आहेत. 

शुक्रवारी रात्री पुन्हा धोंडिभाऊ मनाजी उंडे यांच्या जनावरांच्या गोठ्यातून दोन बैल चोरटयांनी चोरून नेले. यामुळे शेतकरी भयभीत झाले असून शेतकरी व ग्रामस्थांकडून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे.

याबाबत सविस्तर असे की, धोंडीभाऊ उंडे यांच्या घराजवळील असणार्‍या गोठ्यात त्यांची बैलजोडी बांधलेली होती. अज्ञात चोरट्यांनी रात्री उंडे यांच्या राहत्या घराला बाहेरून कडी लावलून व शेजारी असणार्‍या

गोठ्यात बांधलेले अंदाजे 50 ते 60 हजार रुपये किमतीचे दोन बैल सोडून चोरून नेले. रात्री दिड वाजण्याच्या सुमारास उंडे यांना जाग आली तेव्हा घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या आधी 15 ते 20 दिवसांपूर्वी बबन आंधळे यांची 80 हजार रुपयांची म्हैस चोरट्यांनी अशाच पद्धतीने चोरून नेली होती. या घटनेला काही दिवस झाले ना झाले तोच ही घटना घडली. चोरीच्या घटनेमुळे शेतकरी भयभीत झाले आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment