वादळी पावसाने पिकांचे नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाउस पडल्याने या भागातील शेतकऱ्यांचे उसासह सोयाबीन, मका, कपाशी पिकांचे नुकसान झाले.

रविवारी सायंकाळी शिरसगाव परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळी पावसामुळे ऊस, मका, सोयाबीन पिके आडवी झाली, तर कपाशीचेही नुकसान झाले.

तसेच काही ठिकाणी झाडे पडली आहेत. वीज पुरवठा खंडित झाला आहे. शिरसगाव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बाळासाहेब गवारे यांच्या वस्तीवरील

एक बुचाचे झाड विजेच्या खांबावर पडल्याने शिरसगावसह कॉलेज भाग, प्रगतीनगर परिसरात वीज पुरवठा बंद झाला होता. गोदावरी पट्ट्यातही पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment