आ. जगताप यांच्या मध्यस्थीने चिघळण्यापूर्वीच मिटला बुरूडगावकरांचा ‘तो’ प्रश्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-  बुरूडगाव ग्रामपंचायतीचे अनेक प्रश्न आणि समस्या अशा आहेत कि ज्याची अनेक वर्षांपासून वारंवार मागणी होऊनही त्या समस्या सुटताना दिसत नाहीत.

आधी मनपात आणि पुन्हा ग्रामपंचायत यामध्ये भरडल्या गेलेल्या बुरूडगावच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे आता बुरूडगावकरांनी आक्रमक होत,

‘नगर शहरातील गटार गंगेचे पाणी सीना नदीत सोडले जाते.त्या पाण्यामुळे आमची शेती नापीक झाली. कचरा डेपोमुळे दुर्गंधी पसरली.

मोकाट कुत्रेही याच भागात आणून सोडले जातात, एवढे असतानाही महापालिका मात्र पिण्याचे पाणी देत नाही’, असे सांगत बुरूडगावकरांनी कचरा डेपोविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.

आ. संग्राम जगताप यांनी मध्यस्थी करत त्यावर यशस्वी तोडगा काढल्याने कचर्‍याचा प्रश्न चिघळण्यापूर्वीच मिटला.कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात यावी,

बुरुडगावला पिण्याचे पाणी देण्यात यावे, कचरा वाहनांमध्ये झाकून आणण्यात यावा, कचरा डेपोवरील रस्त्याचे काम करण्यात यावे,सीनानदीवरील पुलाचे काम मार्गी लावावे,

स्ट्रीट लाईट बसविण्यात यावे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा आदी सूचना करत कचरा डेपोवर औषध फवारणीमहापौर व आयुक्तांसमोर करण्यात आल्या.

यावर चर्चा होऊन हे सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने त्वरित मार्गी लावण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन बुरुडगावकरांना महापालिकेच्यावतीने देण्यात आले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment