दिलासादायक! ‘त्या’ शेतकऱ्यांना आले 25 कोटी 62 लाख; वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- सध्या कोरोना आणि आता अति पावसामुळे पिडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 2019 सालात जुलै ते ऑक्टोबर या काळात राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या अहमदनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी 25 कोटी 62 लाख रुपयांचा निधी आला आहे.

सदर रक्कम संबंधित बाधितांच्या बँक बचत खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. मदतीच्या रक्कमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये यासाठी सहकार विभागाकडून आदेश निर्गमित करण्यात येणार आहे.

काय आहे महसूलच्या परिपत्रकात? :- ज्या शेतकर्‍यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी पीककर्ज घेतले नाही, पण त्यांच्या पिकांची अतिवृष्टीमुळे व पुरामुळे किमान 33 टक्के हानी झाली आहे.

अशा शेतकर्‍यांना 1 हेक्टरच्या मर्यादेत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार त्या त्या पिकासाठी अनुज्ञेय असलेल्या मदतीच्या दराच्या तिप्पट दराने येणारी रक्कम मदतीचे वाटप होणार आहे.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार नगर जिल्ह्यातील बाधित शेतकर्‍यांना 1 हेक्टरच्या दरानुसार 1 हेक्टरच्या मर्यादेत मदत वाटपासाठी वितिरीत करण्याचा निधी 8 कोटी 54 लाख 8 हजार रुपये आहे.

दुप्पट दराने 17 कोटी 8 लाख 16 हजारांचा निधी असा एकूण 25 कोटी 62 लाख 24 हजारांचा निधी वाटप केला जाणार आहे.

कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या अहवालानुसार मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment