अहमदनगरच्या मुळे यांच्या ‘त्या’ पत्राची सरन्यायाधीशांकडून दखल; काय आहे प्रकारण? वाचा…

Published on -

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- कोर्टाची पायरी चढताना सर्वसामान्यांना दहा वेळेस विचार करावा लागतो. यातील प्रोसेस आणि खर्चिक बाब लक्षात घेता सर्वसामान्य माणूस कोर्टापासून पर्यायाने न्यायापासून दूर राहतो.

याचा विचार करता सर्वसामान्यांसाठी जगाने स्वीकारलेली व्हर्च्युअल कोर्ट या संकल्पनासंदर्भात रिट पिटीशनपर्यंत व इतरही सर्व केसच्या बाबतीत ही संकल्पना लागू करावी

अशी मागणी करणारे एक पत्र जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पाठविले होते. या पत्राची सरन्यायाधीश शरदचंद्र बोबडे यांनी दखल घेतली आहे.

त्यांनी हे पत्र जनहित याचिका म्हणून सुमोटो दाखल करून घेतले आहे. ऑनलाईन प्रणालीचा वापर करून देशातील कोणत्याही न्यायालयात घरबसल्या तक्रार दाखल करता आली पाहिजे,

यासह अन्य काही मुद्दे मुळे यांनी पत्रात मांडून केंद्रीय न्याय व विधी मंत्रालय, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बोबडे, न्यायमूर्ती धनजंय चंद्रचूड यांना पत्र पाठविले होते.

त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेत मुळे यांचे हे पत्र जनहित याचिका सुमोटो (स्वत:च्या अधिकाराच्या अखत्यारीत रूपांतरीत केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!