जिल्ह्यात २४ तासांत कोरोनामुळे आणखी १८ जणांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यात २४ तासांत कोरोनामुळे आणखी १८ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ४६२, तर बाधितांची संख्या ३० हजार १५ झाली. दिवसभरात ५०१ नवे रुग्ण आढळले.

जिल्हा रुग्णालयात १०९, खासगी प्रयोगशाळेत १८४ आणि अँटीजेन चाचणीत २०८ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील ४०, संगमनेर १०, नगर ग्रामीण ३, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट ५, नेवासे १, श्रीगोंदे १, पारनेर १,

अकोले २१, राहुरी १९, शेवगाव ७ रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत मनपा ३९, संगमनेर १२, राहाता १८, पाथर्डी ३, नगर ग्रामीण १०, श्रीरामपूर ३१, कॅन्टोन्मेंट २, नेवासे ९,

श्रीगोंदे १, पारनेर ६, अकोले ८, राहुरी २४, कोपरगाव ४, जामखेड ८ आणि कर्जत ९ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ४६२ जणांचा मृत्यू झाला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment