कांदा निर्यातबंदीबाबत महसूलमंत्र्यांचे मोठे विधान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-  केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी जाहीर करून शेतकर्‍यांवर अन्याय केला आहे. ही निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

केंद्र सरकारच्या या अन्यायी निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष बुधवारी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हंटले कि,

कोरोनामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आता कुठे सुगीचे दिवस येऊ लागले होते. कांद्यालाही चांगला भाव येत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलणार

तोच केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. केंद्र सरकारने कांद्यावर लागू केलेली निर्यातबंदी अभिप्रेत नाही.

अतिवृष्टीमुळे कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. अशा परिस्थितीत थोडी दरवाढ साहजिक आहे. मात्र कांदा आता जीवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ठ नसल्याने त्यावर सरसकट निर्यातबंदी योग्य नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या वल्गना करतात आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत असे नुकसान करणारे निर्णय घेतात

यातून शेतकरी कसा आत्मनिर्भर होणार आहे. मोदी सरकारच्या या लहरी व मनमानी कारभाराने शेतकऱ्यांच्या पल्लवीत झालेल्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment