शत्रूची ‘ती’ संपत्ती विकून सरकारला मिळू शकतात ‘इतके’ अब्ज रुपये;जीडीपीलाही फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या महामारीमुळे खुंटलेली आर्थिक प्रगतीच्या वाढीसाठी आणि सध्याच्या वाढीव खर्चाची पूर्तता करण्यासाठी सरकारने एक लाख कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या शत्रू मालमत्ता विक्री करण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीचे अंशकालीन सदस्य निलेश शहा यांनी हे सुचविले आहे. शाह म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान या दोघांनी 1965 च्या युद्धा नंतर शत्रूंची मालमत्ता संपादन करण्यासाठी कायदे केले. 1971 मध्येच पाकिस्तानने ही संपूर्ण मालमत्ता विकली आहे, परंतु या प्रकरणात भारत 49 वर्ष मागे आहे.

निलेश शाह हे कोटक म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत. वेबिनारमध्ये शहा म्हणाले, “तुम्ही सरकारी मालमत्तेचे मौद्रीकरण केले पाहिजे. जेणेकरून तुम्हाला पुढील खर्चासाठी पैसे उपलब्ध असतील.” ते म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी या शत्रूंच्या मालमत्तेचे मूल्य अंदाजे एक लाख कोटी रुपये होते.

ते म्हणाले की अतिक्रमण हटविणे आणि अशा मालमत्तांची विक्री करुन मालकीची विसंगती दूर करण्याचा हा उत्तम काळ आहे. शहा म्हणाले की अशा प्रकारच्या 9,404 मालमत्ता आहेत ज्या 1965 मध्ये शासकीय नेमणूक केलेल्या कस्टोडियन अंतर्गत आहेत. आर्थिक वृद्धीस चालना देण्यासंदर्भात शहा म्हणाले, “या मालमत्तांची विक्री करा आणि एक लाख कोटी रुपये मिळवा, त्यातून सर्व खर्च पूर्ण होतील.”

* शत्रूची संपत्ती म्हणजे काय?

शत्रु संपत्ति अधिनियम 1968 च्या धारा 8-ए च्या पोट-कलम १ नुसार, शत्रूंच्या संपत्तीचा अर्थ असा आहे की विभाजनाच्या वेळी भारत सोडून गेलेल्या लोकांच्या मालकीची मालमत्ता. हे लोक फाळणीनंतर पाकिस्तानात गेले किंवा 1962 च्या भारत-चीन युद्धानंतर चीनमध्ये गेले आणि तेथील नागरिकत्व घेतले.

पाकिस्तानी नागरिकांच्या अशा 9280 मालमत्ता आहेत तर 126 मालमत्ता चीनी नागरिकांनी येथे ठेवल्या आहेत. केंद्र सरकारने यापूर्वीच राज्य सरकारांना शत्रूंच्या मालमत्तेचा सार्वजनिक वापर करण्यास परवानगी दिली आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार शत्रु मालमत्ता आदेश,

2018 च्या विल्हेवाट लावण्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आले आहेत जेणेकरून राज्य सरकार केवळ शत्रूंच्या मालमत्तेचा सार्वजनिक वापर करण्यासाठी वापर करु शकतील.

* शत्रूची संपत्ती किती आहे आणि कुठे आहे?

पाकिस्तानी नागरिकत्व घेणाऱ्यांच्या राहिलेल्या 4991 मालमत्ता उत्तर प्रदेशमध्ये आहेत, जे देशात सर्वात जास्त आहे. पश्चिम बंगालमध्ये अशी 2,735 मालमत्ता आहेत तर दिल्लीत 487 मालमत्ता आहेत. मेघालयात चिनी नागरिकांनी सोडलेल्या सर्वाधिक मालमत्तांमध्ये अशा 57 मालमत्ता आहेत. पश्चिम बंगालमध्ये अशा 29 आणि आसाममध्ये 7 मालमत्ता आहेत .

 

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment