भाजपचे 21 तारखेला आंदोलन; जाणून घ्या त्याचे कारण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यातील नादुरुस्त रस्ते, खड्डे यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

याच समस्यांना पुढे करत राजकीय पक्षांकडून प्रशासनाला धारेवर धरले जात आहे.नगर-जामखेड, नगर-मनमाड तसेच वाळुंज-अरणगाव बायपास रोडवरील खड्डे बुजविण्यासंदर्भात प्रशासनाकडून होत असलेला

चालढकलपणा व दिरंगाईच्या विरोधात भाजपच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यालयात येत्या 21 तारखेला ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती

नारायणडोहो येथील भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी दिली. या वेळी तालुका सरचिटणीस बाप्पूसाहेब बेरड, तालुका उपाध्यक्ष नानासाहेब बोरकर,

तालुका कोषाध्यक्ष गोवर्धन शेवाळे यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी बोलताना कोकाटे म्हणाले की, पावसाळा सुरु झाल्यापासून नगर-जामखेड,

नगर-सोलापूर, नगर-मनमाड रोड व बायपास रोडची अत्यंत दुर्दशा झालेली असून रोडवर अत्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे. वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असून

कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला जात नाहीये, प्रशासनाच्या याच मनमानी कारभारा विरोधात भाजपच्या वतीने खड्डे बुजवण्यासंदर्भात ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याचे प्रतिपादन यावेळी कोकाटे यांनी केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment