मुळा धरणातून विसर्ग; नदीपात्र वाहते

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-१५ दिवसात मुळा धरणातून मुळा नदीपात्रात ३ हजार २०० दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग झाला आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेले

मुळा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याने १ सप्टेंबरला मुळा धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. मुळा उजव्या कालव्यातून ओढे नाले भरण्यासाठी,

तर मुळा डावा कालव्यातून मुसळवाडी साठवण तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्यात आले. १ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या कालावधीत मुसळवाडी तलावासाठी १०८ दशलक्ष घनफूट पाण्याचा कोटा पूर्ण झाल्याने डावा कालवा बंद करण्यात आला.

५५१ क्युसेकने सुरू असलेल्या उजव्या कालव्यातून गेल्या पंधरा दिवसांत ५५० दशलक्ष घनफूट, तर वांबोरी चारीच्या लाभक्षेत्रात

११ ते १५ सप्टेंबर या कालावधीत १५ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. मुळा धरणाचा पाणीसाठा २५ हजार ४४४ स्थिर ठेवण्यात आला. मंगळवारी सायंकाळी कोतूळकडून मुळा धरणात ५२६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment