कांदा निर्यातबंदीवरून आ.रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली गेल्याने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिसकावणाऱ्या मोदी सरकारबाबत असंतोषाची लाट पसरलेली दिसून येत आहे.

यातच आमदार रोहित पवार यांनी कांदा निर्यात बंदीवरून केंद्राला एक सल्ला दिला आहे. कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले कि,

सरकारला सर्व सामान्यांना दिलासा द्यायचा असेल तर कांदा नियंत्रित करण्याऐवजी वाढलेले पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत.‘सामान्य जनतेला महागाईची झळ बसायला, हे खरे आहे मात्र यासाठी शेतकऱ्याचा बळी देणे चुकीचे ठरेल.

सध्या दरदिवशी पेट्रोल – डिझेलचे दरवाढतच चालले आहे. यावर बोलताना ते म्हणाले कि, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील करांमध्ये थोडी जरी कपात केली तरी वाहतूक खर्च कमी होऊन व्यापारी वर्गासह सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.

कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून पवार यांनी म्हटले आहे. ‘लॉकडाऊन काळात संपूर्ण अर्थव्यवस्था बंद असताना शेतकऱ्यांनी कष्ट करून शेतात राब राब राबत कृषी अर्थव्यवस्था सुरू ठेवली. दिवसरात्र एक करून संपूर्ण कुटुंबासह शेतकरी शेतात राबतो, कष्ट करतो, उत्पादन घेतो.

त्यांना इतके कष्ट घेऊन देखील योग्य मोबदला मिळत नाही. त्यांच्या हक्काचा पैसा हा इतर खर्चात जात आहे. त्यांना कष्टाचा योग्य मोबदला मिळावा हा त्याचा अधिकार आहे, याचा केंद्र सरकारने विसर पडू देऊ नये.

कांद्याचे भाव आज जरी काही प्रमाणात वाढले असतील तरी या वाढलेल्या किमती कायम राहतील, असे देखील नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना काही कालावधीसाठी जर चांगले पैसे मिळत असतील तर केंद्र सरकारने यात आडकाठी आणू नये, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment