शेतकऱ्यांना संकटकाळात केंद्र सरकारची साथ नाही: महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- शेतकऱ्यांचे कोरोनाच्या संकट काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याच्या शेतमालाला ग्राहक मिळत नव्हते. तो माल घरी तसाच पडून राहिला.

नैसर्गिक आपत्तींना म्हणजे महापुराचे संकट असो चक्रीवादळाचे संकट असो किंवा अतिवृष्टीचे संकट सर्व संकटांना शेतकरी सामोरा जात आहे. आणि या संकटात राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांना मदत करत आहे.

पण दुर्दैवाने केंद्र सरकारची यामध्ये साथ मिळत नाही आहे. काही दिवसांअगोदर दूधविक्री वर निर्णय घेतला गेला त्यामुळे मोठ्या प्रमाणात दूध विक्रेत्यांचा नुकसान झालं दुधाचे भाव पडले आणि आता कांदा निर्यातीवर बंदी लादण्यात आली.

चार पैसे शेतकऱ्यांना मिळण्याची वेळ आली की, केंद्र सरकार त्यावर घाला घालण्याचं कास करत आहे असं समजा. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणी मध्ये गेला आहे.

त्याच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली आहे. ही संपूर्ण चीड अन्यायाविरुद्ध आहे आणि काँग्रेस या सर्व शेतकऱ्यांच्या पाठी ठामपणे उभे आहे

आणि म्हणूनच आज काँग्रेसने याविरुद्ध आंदोलन पुकारले आहे. अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment