आनंदाची बातमी : के.रेंज भूसंपादन होणार नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील पारनेर ,नगर व राहुरी तालुक्यातील बहुचर्चित के.रेंज साठी भूसंपादन होणार नाही असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज दिल्ली येथे झालेल्या बैठकीत स्पष्ठ केले आहे.

खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, आमदार निलेश लंके, वनकुटे सरपंच राहुल झावरे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे, पंचायत समिती सभापती अण्णा सोडणर तसेच संरक्षण विभागाची सचिव,

अधिकारी यांची मीटिंग संरक्षण मंत्रालय दिल्ली येथे आज पार पडली. बैठकीमध्ये खासदार शरद पवार साहेब यांनी भूसंपादन करण्यास विरोध केला.

भूसंपादन झाल्यास ह्या भागातील शेतकरी विस्थापित होतील तसेच मुळा धरण, कृषी विद्यापीठ झाल्यामुळे लोकांचे पहिलेच विस्थापन झाले आहे.

मुळा ड्याम असल्यामुळे हा भाग बागायती झालेला आहे ह्या भागातील प्रमुख पीक डाळिंब, ऊस असून त्यामुळे स्थलांतर शक्य नाही. तसेच गायी, शेळ्या,

मेंढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे स्थलांतर करणे शक्य होणार नाही असे पवार साहेब यांनी संरक्षण मंत्र्यांना निर्दशनास आणून दिले

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment