जिल्ह्यातील साडेपाचशेहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  जिल्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना चांगलाच फोफावत चालला आहे.

दरदिवशी कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत चालली आहे तर दुसरीकडे मृत्यूच्या आकडेवारीने 500 चा टप्पा ओलांडला आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्गावर उपचार घेत असताना मृत्यू झालेल्याचा आकडा हा साडेपाचशेच्यावर गेला आहे. आज कोरोना उपचारादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आज दुपारपर्यंत 128 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. सध्या ४ हजार १५२ जणांवर उपचार सुरू आहेत.

आज सकाळी कोरोना उपचारानंतर 1 हजाराहून अधिक कोरोनामुक्त रुगणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आता पर्यंत

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 30 हजार 136 इतकी झाली असून जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट 86.49 टक्के इतका झाला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment