….म्हणून आमदार जगतापांनी अधिकाऱ्यांना झापले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  नगर-कल्याण रोड ते नगर- पुणे हायवे रोड जोडणाऱ्या लिंकरोड वरील पुलाचे काम सुरू आहे.

दरम्यान वाहतुकीसाठी शेजारी केलेला तात्पुरता फुल हा पावसाच्या पाण्याने वाहून गेल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पुलाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, तसेच या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत दोन्ही साईड ने हा रस्ता बंद करून त्या ठिकाणी रस्ता बंदचे फलक लावावे,

जेणें अपघात होणार नाही असे आदेश आमदार संग्राम जगताप यांनी बांधकाम विभागाचे उपअभियंता अशोक भोसले यांना दिले.

रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे मोठे मोठे खड्डे पडले आहे खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांना वाट काढणे कठीण झाले आहे अनेक जणांचे या खड्ड्यामुळे छोटे-मोठे अपघातही झाले आहेत.

नेप्ती नाका ते रेल्वे उड्डाण फुल कल्याण रोड पर्यंतची रस्त्याची अवस्था अत्यंत निंदनीय झाली असून नागरिकांना त्याचा खूप मोठा त्रास होत आहे.

यासाठी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत पावसाळा उघडल्यानंतर सर्व राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यावेळी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment