‘तसे’ झाल्यास मार्केट बंद करू, शेतकरी संघटनेचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिचलेला शेतकरी आता पुन्हा नव्या जोमाने उभा राहू पाहत आहे. आता पर्यंत अनेक पिकांनी बळीराजाची नाराजी केली.

परंतु आता कुठे कांद्याच्या रूपाने कुठे आशा दिसत असतानाच कांद्याची निर्यातबंदी केंद्राने केली. केंद्राच्या या शेतकरी विरोधी व उद्योजक धार्जिण्या धोरणाच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने शेतकर्‍यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर बाजार समितीच्या कांदा मार्केटसमोर निर्यातबंदी आदेशाची होळी करून तीव्र निषेध नोंदवला.

कांद्याचे चाळीमध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असल्याने मागणीनुसार चांगला भाव मिळणार याची खात्री आहे. त्यामुळे निर्यातबंदीच्या नावाखाली व्यापार्‍यांनी कांद्याचे भाव पाडण्याचे षडयंत्र करु नये, अन्यथा शेतकर्‍यांना टोकाची भूमिका घ्यावी लागेल, तसे झाल्यास मार्केट बंद करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

यावेळी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे, जिल्हा कार्याध्यक्ष अहमदभाई जहागीरदार, जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम आदींसह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीरामपूर बाजार समितीत कांदा लिलाव इतर मार्केट कमिटींच्या तुलनेत नेहमीच 500 ते 700 रुपयांनी कमी असतात

अशा तक्रारी उपस्थित शेतकर्‍यांनी शेतकरी संघटनेकडे यावेळी केल्या. याबाबत कारणमीमांसा करण्यासाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बाजार समितीचे सभापती व सचिव किशोर काळे यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी व्यापारी व आडतदार यांची तातडीची बैठक घेऊन योग्य त्या सूचना प्रसंगी दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन उभयतांनी शेतकरी संघटनेला दिले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment