कंगनाच्या भाजप प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीमधील नेपोटिझम, मुव्ही माफिया, स्टार किड्स आदी वाद चव्हाट्यावर आले. कंगना राणौत खुलेआम नेपोटिजमवर बोलत आहे.

कंगना रणौत हिने देखील फिल्म इंडस्ट्रीवर काही गंभीर आरोप केले होते. तिने देखील नेपोटिझम या विषयाला हात घातला होता. परंतु त्यानंतर यावरून राजकारण तापले. यावरून राज्य सरकार आणि कंगना यांच्यात वाक्युद्ध रंगले.

त्यानंतर तिच्या भडक वक्तव्यांमुळे ती टीकेची धनी झाली. त्यानंतर ती भाजपमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या व्हायरल होऊ लागल्या. मात्र कंगनाने आपण कोणत्याच पक्षात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

यावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील कंगनाला राजकारणात येण्याचा कल नाही, असा खुलासा केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कंगनाला राजकारणात येण्याचा कल नाही.

हे प्रकरण या सरकारने वाढविले. कंगना काही राष्ट्रीय नेत्या तर नाहीत. यांनीच तसे बनविले. सरकारने त्रस्त करणे आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केवळ त्यांचीच चर्चा करावी,

हे योग्य आहे काय? आज एक महिला पूर्ण सरकारला पराजित करीत आहे. काय प्रतिमा राहिली सरकारची? दुर्दशा झाली. राजासारखी मानसिकता सोडायला हवी. लोकशाहीत कोणी राजा असत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment