पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना एकरी 50 हजार रुपयाची मदत द्यावी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-राज्यातील बहूतांश भागात गेल्या महिनाभराच्या सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षापासून दुष्काळ, यंदा कोरोनामुळे आधीच शेतकरी अडचणीत आहे.

आता सततच्या अती पावसाने पिकांचे बहूतांश भागात पुर्णतः नुकसान झाले असल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने एकरी 50 हजार रुपयाची मदत द्यावी

अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी केली आहे. दहातोंडे म्हणाले की, राज्यातील बहूतांश भागात गेल्या महिनाभरापासून सतत पाऊस पडत आहे.

त्यामुळे खरिपातील सोयाबीन, बाजरी, मका, भुईमुग, कापुस, कांदा यासह ऊसाचेही मोठे नुकसान झाले. अनेक भागात ही पिके जागेवर सडली आहेत. त्याचा यंदा उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.

गेल्या काही वर्षापासून राज्यातील शेतकरी दुष्काळाने पिचला आहे. शेतीत सतत अडचणीत येत आहे. गेल्यावर्षीही परतीच्या पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते.

शेतीला जोड असलेले कुक्कुटपालन, शेळीपालन, दुध व्यवसायासह पुरक उद्योगही अडचणीत येत आहेत. त्यात यंदा कोरोना महामारीच्या संसर्गामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

सततच्या शेतीवरील संकटाने शेतकरी उध्वस्त होत आहे. त्यात आता गेल्या महिनाभरापासून सततच्या पावसाने पुन्हा शेतकर्‍यांवर संकट कोसळले आहे.

झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना प्रती एकर 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर सरकारने दखल घेतली नाही तर अंदोलन करण्याचा इशारा दहातोंडे यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment