अज्ञाताने केला लाखोंचा कांदा भस्मसात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  लॉकडाऊन मुळे आर्थिक कंबरडे मोडलेला शेतकरी शेतात पिकवलेल्या शेतमालाच्या विक्रीतून स्वतःचा प्रपंच सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

मात्र काही समाजकंटकांकडून बळीराजाला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याची घटना पारनेर तालुक्यात घडली आहे. पारनेर तालुक्यातील चोंभुत येथील

नारायण बरकडे यांच्या कांदा चाळीला कोणीतरी आग लावुन पेटुन दिल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर कांदा चाळीत सुमारे ३०० गोणी इतका कांदा होता.

साधारण १०० गोणी कांदा जळून खाक झाल्याने आताच्या बाजार भावाप्रमाणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून चोंभू परिसरात शेतकऱ्यांकडुन अशा मनोवृत्तीचा जाहीर निषेध होत आहे.

या संदर्भात तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता तातडीने घटनास्थळी भेट दिली. झालेल्या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.पारनेर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

शेतकरी नारायण केरू बरकडे यांनी काही दिवसांपूर्वी कांदा चाळ ही कांदा व्यापाऱ्याला साडेचार लाख रुपयांना विकली होती. त्याचे पैसेही पाहायला मिळाले नाही तोच अज्ञात समाजकंटकांने कांदा चाळ पेटवून दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment