अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने आधीच चिंताग्रस्त असलेला शेतकरी आता आणखी एका समस्यांमुळे पुन्हा चिंतेत पडला आहे.

अनेक संकटाचा सामना करत शेतकऱ्याच्या शेतात पिके डोलू लागली असतानाच आता मोर-लांडोर, रानडुक्कर आणि वान्नर यासारख्या पक्षी व प्राणी यांच्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

रानटी प्राण्याचा प्रकोप वाढत चालला असून हातातोंडाशी आलेले उभे पीक एका रात्रीतून फस्त करत आहेत. रानटी प्राण्यापासून पिकाचा बचाव करण्याकरिता शेतकरी वेगवेगळे पर्याय करून थकले आहेत.

मात्र कोणताच तोडगा या प्राण्यांपुढे सकारात्मक ठरला नाही. प्रामुख्याने शेतांमध्ये रानडुक्कराच्या संख्येत वाढ झाली असून ते सर्वात जास्त पिकाची नासाडी करत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

दरम्यान याबद्दल लवकरात लवकर वन विभागाने पंचनामे करुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी भंडारदरा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी पडवळ डी.डी. म्हणाले, अभयारण्य असल्याने वन्यप्राणी, पक्षीचा वावर आहे. जंगलात हे मुक्त विहार करतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. याबाबत नुकसानीचे पंचनामे करून वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवू.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment