अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- खानापूर शिवारात दोन बिबट्यांच्या झुंजीत जबर जखमी झालेल्या बिबट्याचे राहुरी येथील रोपवाटिकेत उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी मृत्यू झाला.
वनविभागाचे वतीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हरिभाऊ आदिक यांच्या शेतात शनिवारी पहाटे दोन बिबट्यांची जबरदस्त झुंज झाली. त्यांच्या डरकाळ्यांमुळे वस्तीवरील सर्व लोक जागे झाले.
जखमी बिबट्याने बचावासाठी मानवी वस्तीचा आश्रय घेतला, तर दुसऱ्याने उसात धूम ठोकली. त्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.
पंजाचा फटका बसल्याने अंतर्गत रक्तस्त्राव होऊन बिबट्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, यश आले नाही. पंचनामा, शवविच्छेदनानंतर वन अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved