नुकसानीपोटी ‘त्या’ शेतकऱ्यांना ३ कोटींची भरपाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- मागील वर्षी जुलै ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे उभ्या पिकांचे व काढणी केलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होईन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता.

भरपाई मिळावी, यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ३ कोटी १ लाखाची नुकसान भरपाई सरकार देणार असून

ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँकखात्यात जमा होणार आहे. आमदार काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून महसूल विभागाला सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पिकांची काढणी करून मोकळ्या जागेवर सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांचे ज्या ठिकाणी ढिगारे लावले होते, त्या पिकांना जागेवरच मोड आल्यामुळे झालेल्या

नुकसानीचेही पंचनामे करण्याच्या सूचना देत नुकसानीपोटी ६ कोटींची भरपाई मिळावी, यासाठी मदत, पुनवर्सन खात्याकडे आमदार काळे यांचा पाठपुरावा सुरु होता.

कोपरगाव तालुक्याला पहिल्या टप्प्यात ३ कोटी १ लाखाची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या संकटात शेतकरी अडचणीत असताना व मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या

संततधार पावसामुळे मागील वर्षीप्रमाणे अतिवृष्टी व पुर येऊन मागील वर्षीची पुनरावृत्ती होते की काय, या विवंचनेत शेतकरी सापडला असताना सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment