तहसीलदारांच्या आक्रमकतेमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  प्रशासनाला डावलून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी वाढली आहे. प्रशासनाचे कोणतेही भयभीती न बाळगता हे वाळू तस्कर सध्या सुसाट सुटलेले असतानाच,

श्रीगोंदा तालुक्यात तहसीलदारांनी या वाळू तस्करांवर आक्रमक कारवाई केली आहे. श्रीगोंद्याच्या प्रभारी तहसिलदार चारुशीला पवार यांनी एका महिन्यात चार ठिकाणी अवैध पध्दतीने जमा केलेल्या चार वाळूचे साठे जप्त केले.

याप्रकरणी ५ लाख ४६ हजाराचा महसूल जमा केला आहे. तर चार वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन ६ लाख ६ हजार ७१ इतका दंड वसूल केला आहे.

पेडगाव येथे अवैध वाळू उपसा करणा-या १० व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. म्हसे येथील घोड नदीपात्रातून १ वाहन अवैध वाळू वाहतूक करताना पकडले आहे.

३५ ब्रास अवैध वाळू साठ्यांचा लिलाव करुन १ लाख ७५ हजार वसूल केले आहेत. अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करताना आढळून आलेल्या

यंत्रसामग्रीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असा इशारा चारुशीला पवार यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment