पाईपलाईन दुरुस्तीचा नागरिकांना फटका; शहरात होतोय दूषित पाणीपुरवठा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचे संकट घोगावात असतानाच संगमनेर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण होऊ लागली आहे.

संगमनेर शहराला थेट धरणातून पाणी पुरवठा करणार्‍या जलवाहिनीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

एरव्ही या पाईपलाईनमधून येणार्‍या पाण्याचा प्रवाह अडखळल्यास नदीपात्रातून शहराला पाणी पुरवठा केला जात. मात्र राजकीय आणि प्रशासकीय आशीर्वादाने पोसलेल्या वाळूतस्करांमूळेे कधीकाळी साक्षात ‘अमृतवाहिनी’ ठरलेल्या प्रवरेची आज गटारगंगा झाली आहे.

त्यामुळे ‘पाणीबाणी’च्या वेळी नदीपात्रातील विहिरींमधून पाणी उपसा केल्यास त्यातून दुर्गंधी येत असल्याने संगमनेरकरांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.

जवळपास लाखभर लोकांचे जीवन धोक्यात घालून शहरातील वाळूतस्करांची पाठराखण कशासाठी असा गंभीर प्रश्नही यानिमित्ताने उभा राहिला आहे.

निळवंडे धरणाची पाईपलाईन शहरात आल्यापासून पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या विहिरींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेल्याने तस्करांनी शहरालगतच्या नदीपात्रातील ना घाट सोडले,

ना विहिरी जेथे वाळू मिळेल तेथून अर्निबंध बेसुमार उपसा केला. त्यामुळे पायरीघाटापासून ते थेट आडच्या नदीपर्यंतच्या पात्राची अक्षरशः वाट लागून पात्रातील दगड वरती आला आहे.

त्यामुळे आवर्तनाचे पाणी बंद झाल्यानंतर या संपूर्ण परिसरात प्रचंड वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या भल्यामोठ्या डबक्यात पाणी साचून राहते,

आणि काही दिवसांतच त्यातून दुर्गंधी सुटते आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर आला असून देखील लोकप्रतिनिधीसह प्रशासन देखील गप्प असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे.

कोरोनाच्या या महामारीच्या काळात नागरीसुविधांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment