अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच कोरोनारुग्णांबाबत झाले असे काही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात तीन महिन्यांत प्रथमच जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण घटले. प्रथमच सर्वात कमी ३१६ बाधित गुरूवारी आढळून आले. दिवसभरात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही.

तीन महिन्यांपूर्वी रुग्णवाढीचा दर २७.८१ होता, आता तो २४.१४ टक्के झाला आहे. मृत्यूचा दर १.५३ टक्के झाला आहे. जुलैपासून जिल्ह्यात रुग्ण वाढत होते. सर्वाधिक दर नगर शहर व संगमनेर तालुक्यात होता.

हा दर गुरुवारी प्रथमच घटला. नगर शहरात ४५, तर संगमनेरमध्ये १९ रुग्ण आढळले. यापूर्वी नगर शहरात दररोज ३०० हून अधिक, तर संगमनेरमध्ये ७० ते ८० रुग्ण आढळून येत होते.

जिल्ह्यात रोज १० ते २५ जणांचा बळी जात होता. गेल्या दोन दिवसांपासून रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३१६ रुग्ण आढळून आले.

गुरुवारी ४३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८,६८८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.३९ टक्के आहे.

उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २६५२ आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४१, खासगी प्रयोगशाळेत ९१ आणि अँटीजेन चाचणीत १८४ बाधित आढळले. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ५२ हजार १३६ झाली असून, बळींची संख्या ७९६ आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment