शेतकऱ्यांच्या भरीव मदतीसाठी खासदारांना घेवून पंतप्रधान मोदींची भेट घेणार – शरद पवार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-राज्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हे संकट अस्मानी आहे त्यामुळे त्याचे परिणाम दीर्घकाळ असतील.

शेतकऱ्यांना भरीव मदतीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. या परिस्थितीला तोंड देण्याची ताकत तुमच्यामध्ये आहे पण ज्यावेळी शेतकऱ्याकडे ताकत नसते,

तेव्हा सरकारची ताकत उभी करावी लागते. ती आम्ही उभी करू. केंद्राने राज्यांना मदत करायला पाहिजे राज्याच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्राची मदत घ्यावी लागेल. याबाबत येत्या दहा दिवसात पंतप्रधानांना भेटू आणि महाराष्ट्राला मदत केली पाहिजे. अशी विनंती करू असं शरद पवार म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment