अद्याप वीजही न पोहोचलेल्या ‘त्या’ आदिवासी गावात ‘हे’ मंत्री पोहोचले दुचाकीवर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  महाराष्ट्रातील अजूनही अनेक जिल्ह्यांमधील काही आदिवसई भाग अतिशय दुर्गम आहेत. त्या ठिकाणी सोयोसुविधा पोहोचलेल्या नाहीत.

असेच एक अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी-संगमनेर सीमेवर दूरवर जंगलात वसलेल्या बोंबलदरा या आदिवासी पाड्याची तीच अवस्था. या पाड्यावर अद्याप वीज पोहोचली नसल्याने त्याठिकाणी ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यात आले.

आणि त्यासाठी उद्घाटन करण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे थेट अरुंद रस्त्यावरून दुचाकीवर तेथे पोहोचले. या पाड्यावर अद्याप वीज पोहोचली नव्हती.

त्यामुळे हे उद्घाटन खऱ्या अर्थाने समाधान देऊन गेल्याच्या भावनाही तनपुरे यांनी ट्वीट करीत व्यक्त केल्या आहेत. येथे वीज पोहोचवण्यात राज्य सरकारला यश आले असून तेथील ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते झाले.

याबाबतचा अनुभवच मंत्री तनपुरे यांनी ट्विटवर शेअर केला आहे. तनपुरे यांनी म्हटलय, ‘बोंबलदरा, अगदी कमी वस्ती असलेला माझ्या आदिवासी बांधवांचा पाडा.

राहुरी-संगमनेर सीमेवर, दूरवर जंगलात वसलेल्या या आदिवासी वस्तीवर दुर्दैवाने अद्याप वीज पोहोचली नव्हती. आज मी स्वतः अरुंद वाटेवरून मोटारसायकलने प्रवास करत येथील ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन केले.

मंत्री झाल्यापासून बरीच उद्घाटनं केली. मात्र बोंबलदरा येथील माझ्या आदिवासी बांधवांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आज जो प्रकाश पडला आहे. तो मला मोलाचा वाटतो.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment